Tuesday, November 17, 2009

पश्च्याताप....... पण कधी?


१६ मार्च २०५१ ....
पंजाब मधील ते एक जुन्या काळातिल समृद्ध खेडं. नुकताच बैसाखी चा सण आटोपलेला. आजकाल सण येतात अन् जातात. पहिल्या सारखी मजा राहिली नाही. जसप्रीत कौर ला जुने दिवस आठवत होते, अन् त्या आठवाने व्याकुळ होवून शांतपणे उसासे सोडत बसली होती ती. २०१७ साली लग्न होउन ती ह्या घरात आली. कोण समृद्धि होती त्यावेळी . सुख कसं भरभरून वाहत होतं. शेतीत नुसतं सोन पिकत होतं. भारताची सम्पूर्ण भूक भागवणारा प्रान्त म्हणून नाव होतं पंजाबचं. पण गेले ते दिवस. शेती आहे अजुन ही पण आता आधी सारखी रया नाही राहिली . सगलं कसं उदास ..भकास....

यश आणि जगजीत जसप्रीत ची दोन मुलं. त्यांना पदरात घालून त्यांचा बाप १८ वर्षापुर्विच देवाघरी गेला . लहान लहान मुलांना घेउन ह्याच काळ्या मातीत कसून जसप्रीत ने दोघांना लहानाचे मोठे केले. दोघेही भाऊ आता शेती करत होते आणि आपल्या आईला सुख द्यायचा पुरेपुर प्रयत्न करत होते. यश लहान आणि जगजीत मोठा. यश लहान असून पण होता धडधाकट . जगजीत मोठा पण नाजुक चणीचा.

यश जागा होता. वाट बघत होता उर्वशिची . आता येइल मग येइल . थोडा सा अधीर झालेला . पण सध्या उर्वशी, मोठ्या जगजीत सोबत प्रणय क्रीडेत रत होती.

पंचेविस तीस वर्षापूर्वी असला प्रकार .... विचार करण पण पाप होतं. भावाची बायको म्हणजे भाभी .... तिच्याकडे बघण पण पाप होतं. तर तिची वाट बघत बसण. कुणी असा विचार पण नव्हतं कधी करत. विज्ञानाचे चमत्कार घडत होते. ग़र्भजल तपासणी अन् लिंग निदान परीक्षा हे दोन शोध लागलेत. हें शोध काय लागलेत माकडाँच्या हाती कोलितच मिळालं जणू, हें आक्रित घडलं.......
त्या काळी असं काही घडण म्हणजे स्त्री देहाची घोर विटम्बना समजली जायची. पण आता मात्र ती जगण्याची एक अपरिहार्यता झालेली होती. स्त्री पुरुष प्रमाण झालेलं होतं दर हजारी ३०० .....
इतकी विषमता. दूसरा काही पर्यायच उरला नव्हता. जगजीत २ वर्षांनी मोठा . अगदी कठिन परिस्थिति असून सुद्धा बँकेचे कर्ज काढून आणि मोठा हुंडा देऊन त्यांनी उर्वशिला घरी आणलं . तशी उरवशी पण नशिबवानच ... तिला फ़क्त दोनच नवरे साम्भाळावे लागत होते. तिच्या कित्येक मैत्रीणीना तर तिन किंवा चार चार माणसांची शय्या सोबत करावी लागत होती.
विसाव्या शतकातलं एकास एक हें तर केवळ एक स्वप्नच उरलं होतं.

उर्वशिला यायला उशीर होतोय असं बघून यश ची कुरकुर सुरु झाली. तसाही उर्वशिला यश बरोबर जास्ती आवडायचं. कारण ही अगदी उघड होतं ... यश कसा तिला पूर्ण खुश करून टाकायचा. जगजितच्या पण ते लक्षात आलं. थोडसं समजदारिन घेत त्यान पण उर्वशिला मोकलं केलं. आणि जाता जाता म्हणाला तिला ..आज लवकर सोडतोय पण उद्या मात्र भरपाई करणार हं ...
आणि मग उर्वशी पण एक खट्याळ कटाक्ष टाकत तिथून उठली अन् अंगावर्च्या कपड्यांची मुळीच पत्रास ना बाळगता तशीच यश च्या खोलीत शिरली. आणि मग परत एक वार त्या दोघांच्या प्रेमाला उधाण आलं.

पहाटेच्या सूर्य किरणां बरोबर म्हातारी जसप्रीत उठली . आन्हिकं आटोपून मोजुन चार पेले पाण्यान स्नान आटोपून देवासमोर पुजेला बसली . आणि मग अंगाला आळोखे पिळोखे देत अल्पवस्त्रा उर्वशी तिच्या मागोमाग न्हाणीत शिरली. अडीच तीन पेले पाणी पुरलं तिला ... यश आणि जगजीत अजुन झोपेतच होते......

म्हातारीला चाहुल लागताच ती बोलली .... अग उठलीस का? चल चहा मांड माझा पण दोघी घेऊ या घोट घोट भर
उर्वशिचं पोट आता बरच पुढे आलं होतं. नेमका कोणाचा प्रताप आहे ..कळायला काही मार्ग नव्हता, तसा ..पण बहुदा यशचाच पराक्रम असावा असं तिला वाटत होतं. सहावा महिना सुरु होता तिला .
काय म्हणतोय तुझा डॉक्टर?
सासु सुनेचं संभाषण सुरु झालं.
माँजी डाक्टर बोलला की मुलगीच आहे .
मग काय ठरवलय तू? म्हणजे?
माँजी किती आनंदाची गोष्ट आहे... ना .... आणि तपासणी केल्यावर बोलला की एकदम छान आहे बाळाची प्रकृति पण.
मी खरं तर मुलगा की मुलगी हे नव्हते विचारायला गेले ..
मी तर गर्भ कसा आहे हे बघायाला गेले होते. आणि त्यानी ही आनंद वार्ता स्वतःच सांगितली.

जसप्रीत ला आठवली २०१८ च्या ऑक्टोबर मधली ती संध्याकाळ. पाळी चुकली म्हणून सासु तिला घेउन डॉक्टर कड़े तपासायला आलेली. तपासण्या झाल्यात. एक सुई टाकुन पोटातुन पानी काढलं. परत दुसऱ्या दिवशी तिची सासु तिला घेउन दवाखान्यात आली . तिला काही एक ना विचारता निर्णय घेतल्या गेला. आणि तिचा गर्भपात करण्यात आला. एकांतात खुप रडली होती ती.

दोन वर्षानी मग जगजीत झाला आणि मग यश चं आगमन झालं. पण दरवेळी ती पूर्ण पणे अलिप्त असायची.

जसप्रीत न उर्वशिला जवळ बोलावलं. ये बेटा माझ्याजवळ बैस ना....
मी लावू का तुझ्या पोटाला हात?
उर्वशी तिच्या जवळ बसली. जसप्रीत ने तिला जवळ ओढली.
आणि अतीव ममतेने तिच्या पोटावरून , ओटीपोटावरून ती हात फिरवू लागली.

हळूच मग ती स्वतःचा कान तिच्या पोटाशी घेउन गेली.
लबाड बघ बोलते आहे माझ्याशी.
हळूच तिच्याकडे तोंड करून बोलायला लागली......
बेटी माफ़ कर गं मला...
मी किती पापीण ना ....
तुला आधीचं येऊ द्यायला हवं होतं गं मी.......
तिचे दोन अश्रु सांडलेत उर्वशी च्या पोटावर .....त्या ना आलेल्या बलिकेच्या
आठवणीत.....
आणि त्याच वेळी बाहेर पण अवेळीच आभाळ भरून आलेलं होतं...

सुनील जोशी
१६/११/२००९

No comments: