Sunday, July 10, 2011

हृदय हिरावून घेणारे आधुनिक शिक्षण

हृदय हिरावून घेणारे आधुनिक शिक्षण

‘जिजाबाई निरक्षर होती; पण तिने शिवप्रभू घडवला. आजच्या उच्चशिक्षित, उच्चपदस्थ,
उच्चभू स्त्रीने शिवाजीच्या पासंगाला पुरेल, असा एक तरी पुत्र दिला आहे का ?

त्या आजीचे वय आहे ८५ वर्षाचे. त्यांची दृष्टी अजूनही उत्तम आहे. श्रवणही
चांगले आहे. ऊस खाता येईल, असे दात आहेत. शरीर तसे धडधाकट आहे. त्या घरकाम आणि स्वयंपाकसुद्धा करतात. त्यांचा वीस वर्षे वयाचा नातू आजीची थट्टा करण्याकरता विचारतो,

आजी, पृथ्वी सूर्याभोवती का फिरते ?
आजी : अरे, सूर्य नव्या रुपयासारखा चमकतो ना म्हणून. सगळी दुनियाच रुपयाभोवती फिरते ना. पृथ्वीचा काय अपराध ?
नातू : अरे वा ! आजी तू खूप शिकलेली आहेस.
आजी : छे ! छे ! असले काही अभद्र बोलू नकोस. मी चुकीचे सांगितले का ?
नातू : आजी, तू अगदी खर तेच सांगितलेस; म्हणून तर मी विचारले.
आजी : खरे बोलायला शिकण्याची काय गरज ? शिकावे लागते, ते खोटे बोलण्याकरता. पत्रकार,
शिक्षक, डॉक्टर, व्यापारी असे सगळे परदेशात शिकायला जातात, ते लोकांना भुलवून अधिक पैसे कसे उपटता येतील, याकरताच ना ? तिथे खोटे बोलावे लागते. भारतातल्या शिक्षणाने तसे लोकांना चांगले फसवता येत नाही. परदेशातल्या शिक्षणाने तो खोटे बोलण्यात विलक्षण कुशल होतो. (गंभीर वाणीने) खरं बोलायला शिकण्याची आवश्यकता नाही. गुन्हेगाराला, खुनी माणसाला पाठीशी घालायचे असेल, तर खोटे बोलावे लागते. रुग्णाकडून जास्त पैसे उकळण्याकरता वैद्याला खोटे बोलावे लागते. लोकांना फसवून आपला माल त्यांच्या गळी उतरविण्याकरता व्यापार्‍याला खोटे बोलावे लागते. श्रीमंत वडिलांच्या मुलाकडून पैसे उकळण्याकरता शिक्षकाला खोटे बोलावे लागते. त्याकरता शिकावे लागते. खरे बोलणार्‍याला शिकण्याची काय गरज ? खरे बोलणार्‍याच्या
जवळ केवळ हृदय हवे आणि तेच तर शिक्षणाने हिरावून घेतले आहे ना !

आंतरजाला वरुन साभार .....

Sunday, July 3, 2011

बस्स झालं... आता... मी बोलणार ...

मला खुप खुप काही बोलायचं आहे. खुप काही सांगायचं आहे. सुरुवात कुठून करू ... काही कळत नाहीय्ये. बाबांच्या कड़क शिस्तिबद्दल सांगू , की आईच्या अवास्तव अपेक्षां बद्दल , ताईच्या हुशारिबद्दल बोलू की आजी अजोबंच्या So Called लाडान बिघडलेल्या माझ्याबद्दल.... डोक्यात प्रचंड गोंधळ उडालेला आहे ... पण आज अपुन बोल के रहेगा... जादा सोच सोच के साला दिमाग का दही हो रहेला है ...

आशय अभिमन्यु पांडे . वय वर्ष १८ पूर्ण . लोकशाहीत मतदानाचा अधिकार प्राप्त. यंदाच १२ वी पास झालोय . दहावी बारावी दोन्ही CBSE pattern मधून केल्यात. अत्यंत कुशाग्र बुद्धीचा .. पण... हा पणच सगळा गोंधळ करतो ना .... दहावी ला ८९ % टक्के मार्क्स मिळालेत . एवढे मार्क्स मिळाले की सायंस च करायचं असतं ... आमच्या कड़े घर काम करणार्या रखमा बाई चं पण हें ठाम मत... उमलत्या कळीन कसं उमलायाचं ..माळी परिवार ठरवणार ....
अरे मुली सारखी मुलगी .. ती .. तुझी कृतिका ताई ... तिला जमते ..आणि तुला नाही जमणार ? ते काही नाही .. मुळीच ऐकणार नाही काही. तुला काही कळत नाही ... मी सांगते आहे ना ... तुला सायंस च घ्यायचय... आणि दिलय ना देवाने डोकं ..त्याचा कर रे वापर.... इति महामहिम मातोश्री ...

ए गधड्या... जास्त अक्कल नाही पाजळायची ... तू आपले पेपर सोडवतान्ना वापरतोस तेवढी पुरे आहे . म्हातार्यानी जास्ती लाडावून ठेवलय ना ... माजोरडा कुठला ... म्हणे सायंस नाही घ्यायचं ... भिकेचे डोहाळे लागलेत का? ... जास्ती आवाज नाही पायजेल ... गप गुमान सायंस ला एडमिशन घ्यायचे ..समजलं का? नाही तर फिर मै हु और तू है ... प्रचंड डरकाळी फोड़त पिताश्री गरजलेत.

ए शहाण्या ... काय लावलाय? का असा त्रास देतोय सर्व्याना? आपण अभ्यास केला ना की जमते सगळ. का छळतोस ... एवढे सगळे म्हणताहेत तर घे की एडमिशन सायंस ला. तुला काही कळत की त्यांना रे ... यूज लेस फेलो ... इति वंदनीय कृतिका ताई ...

का रे बाबा असा छळतोस? काय घोडं मारलय आम्ही तुझं ...कुठल्या जन्माचा वैरी आहेस रे... चार शब्द काय गोड बोललो ... की लगेच पलट्लास... सगळे कसे टोचू टोचू बोलतात रे आम्हाला ... ऐक रे ऐक जरा त्यांचं ..सायंस तर सायंस ... घेउन टाक रे एकदाची एडमिशन ....नको रे बोल लाउस उगा ह्या म्हातारपणी .. थकलो रे आता ... रामकृष्ण हरी... करवादत आजोबा बोललेत...

खर तर मी कलेचा भोक्ता . पाना फुलात, प्राण्या पक्षात रमणार मी... कळी उमलताना बघून आनंदाने नाचणारा मी ... समाजातल्या घटनांवर चिंतन करणारा मी ... निसर्गाच्या किमयेने चकित होउन व्यक्त होऊ पहाणारा मी.. त्या किमया ..त्या गोष्टी ... भुलावतात मला ... आणि मग सगळ्यानि कट केला ... अन त्यात माझ्या त्या दहावीच्या मार्कान्नी घात केला... जखडून टाकलं ह्या सगळ्यानि मला त्या नियमबद्ध वैज्ञानिक परिघात.

सगल्यांच्या आग्रहाखातर ... एकदाची सायंस ला एडमिशन घेतली . आणि पुढच्या दुष्ट चक्राला सुरुवात झाली . आई ने चंग बांधला ह्याला इंजिनियर च करायचा ... बाबांची त्याला सम्मति होती अर्थातच ... ताई आता तिकडे लांब होती ..पण दुरून तिचा रिमोट कंट्रोल सुरु होताच . ११ वितच माझ्या त्या ट्यूशन सुरु झाल्यात ... सकाळी ६ ते संध्याकाली ८ पर्यंत बिझिच बिझी. JEE , AIEEE , SEE, BITSAT चे क्लासेस पार थकून जायला व्ह्यायचं .

एक स्वभाव आहे माझा ...कदाचित दुर्गुणच म्हणा ना ... नाही म्हणता येत नाही मला ... कदाचित त्यामुळे ...येवडा थकून सुद्धा मी परत दुसर्या दिवशी सकाळी तयारच असायचा ट्यूशन ला जायला...
तसा दुर्गुणाची खाणच मी ... कोणी ही मोट्ठ्या आवाजात बोललं की घाबरून जाणे हां एक अजुन अवगुण. सरळ गोगल गाई सारखा कोशात चालला जातो मी. विशेषतः बाबा ...ते सुरु झालेत की ...मी कोमेजुन जातो . कसले ओरडतात. आतून म्हणावसं वाटते ...राहू द्या ना बाबा आता वाजले की बार .. (अर्थात आमचे हो). त्यांचं असतही बरोबर कधी कधी ... पण ह्याचा असा तर काही अर्थ नाही की आरडा ओरडा करुनच सगळ सांगावं ? आपली गोष्ट पटवून द्यायची एक पद्धत असते ना.. हीच ह्यांची पद्धत ... सतत हम करे सो कायदा वाली.. शुद्ध दादागिरी ... Autocratic Management का काय म्हणतात ना तसं जगायाची सवय झाली आहे आता

ही आमची मम्मी उर्फ़ माँसाहेब .. ह्यांची एक ठाम समजूत ... मी म्हणजे एक कुक्कुलं बाळ. मला काही समजतच नाही . तसा चार लोकात वावरतो मी पण ... पण सगळे कसे मला फसवायालाच टपलेले आहेत ..मला कळतच नाही आणि ते ... बिचारा मी... स्वताचा कुठलाच निर्णय घ्यायला मी लायक नाहीय्ये. चार लोकात सतत माझी लाज काढ़ते. सतत दाखले देते त्या कृतिका ताईचे ... ती कशी स्मार्ट आणि मी कसा वेंधळा हें सांगते अगदी आवर्जुन. I hate this comparison. I too am an individual entity. No one ..literally no one understand this. मग मला काही बोलावासच वाटत नाही. माझ्याकडे पण सांगायला खुप काही आहे ... पण ह्या ..ह्या उमलण्याच्या वयातच पार कोमेजुन गेलोय मी. कोणी समजावून सांगेल का ह्याना ...

आता हें पात्र ...कृतिका अभिमन्यु पांडे ... आमची ज्येष्ठा ...माझ्या लेखी ..ताईटली... चार वर्ष आधी जन्माला काय आली ..जणू सगळ्या जगाला शाहाणपणा शिकवायचा ठेकाच मिळाला जणू हिला. मी हिटलरला नाही भेटलो ..तो मेला म्हणतात ..पण मला खात्री आहे त्याच्या पुनर्जन्म झाला ह्याच घरात .. अभिमन्यु पांडे कड़े ... त्याच घरात मी पण जन्मलो ..एक ज्यू म्हणून ... अनायासे हिटलर ला छळ छावणित एक ओकारू सापडले . जगणे दुश्वार केलय ... आता जरा दूर काय गेलिये नोकरी करायला ... मी सुटकेचा निश्वास सोडला ..पण कसचं काय ... तिथून माँ साहेबांच्या मार्फ़त On Line छळ वाद सुरूच आहे ...

आजी आजोबा असतात घरात ... आई बाबा घरी नसले की आजी बोलावते हळूच ... हे हवय का ..ते घे रे ..करते थोडेसे लाड .. तेवढेच चार क्षण सुखाचे. A good old lady ... पण आई बाबा घरी अस्लेट की जणू त्यांच्याही प्रेमाचा झरा कसा आटून जातो. Poor Old Fellows.

बारावी सायंस झालो . स्वभावानुसार स्वताला झोकुन दिलं. पण एक नियति पण असतेच ना . किती हुशार असो ..पण नेमके त्या वेळेवर काय होते त्या वर खुप काही असते अवलंबून . रात्र रात्र जागुन अभ्यास केला. परीक्षेचा पेपर समोर आला ... आणि ऐन वेळी काही आठवेच ना. त्या पेपर मधले ते प्रश्न ओळखीचे वाटेतच ना. जणू आफ्रिकन आदिवासी माझ्या डोक्या भोवती फेर धरून आदिवासी नृत्य करू लागलेत .

पाच मिनिट डोळे बंद करून बसलो. देव आठवलेत . डोळे उघडून परत पेपर बघितला . आता थोड़ा ओळखिचा वाटला. ती अफ्रीकन भूतं थकली असावीत बहुतेक .. हळु हळु ताळ्यावर आलो .. पेपर सोडवायला लागलो .. सोडवत गेलो ..सोडवत गेलो ... वार्निंग बेल ..मग शेवटची बेल ... पेपर पूर्ण नाही झाला .. अपेक्षित यश नाही मिळू शकलं ... ना धड पास ना नापास ... चक्रव्युव्हात सापडलेला अभिमन्यु जणू ( इथे अभिमन्यु चा पुत्र..)

पेपर देऊन परत येत नाही तोच टोमणे सुरु. On Line पहिला टोमणा ... आळस नुसता आळस. चांस होता ..हुकवलास. आता बस भांडी घासत ... माँ साहेबांचा एक रिमार्क ... हाताने घालावलिस संधि .. बाबांसमोर उभे रहायची हिम्मतच नाही झाली . त्यांचं नक्की एकच वाक्य असणार ..खात्री पूर्वक .. खाऊन खाऊन माजला आहेस ..सांड नुसता ..कधी येणार अक्कल देव जाणे .
आता असं अपयश आलेला का मी एकटाच आहे? पण ह्या अघटिताची जबाबदारी तर मलाच घ्यावी लागणार ना. खरं तर जी माझी वाट नव्हती त्या वाटेवर मी मार्गक्रमण केलं. पाय रोवायची धडपड़ पण केली .... नव्हे माझ्या परीने यशस्वी पण झालो ... शिखर नाही गाठू शकलो ...ह्यांच्या अपेक्षा नाही पूर्ण करू शकलो ... यशाचे सगळे वाटेकरी..पण अपयशाचा मी एकटाच धनि .. असचं जर जगण असेल प्राक्तनात ..तर काय अर्थ आहे ह्या जगण्याला .. का करायचं हे सगळ?
आता मी ठरवलयं ..बस आता नाही करणार हे सगळ ... नाही जगणार असलं बंदिस्त आयुष्य . झुगारून देणार ही सारी बंधन .. मुक्त होणार आहे मी ... आता बोलायला लागलोय ... आता करून पण दाखवणार आहे मी... बस ..बस ..बस..

बस्स झालं... आता...

सुनील जोशी
२६/०६/२०१०

Friday, June 24, 2011

मुक्तिबंध ... (सामाजिक कथा )

आभाळ भरून आलयं. कधीही बरसणारयं आता. माझे डोळे पण असेच भरून आलेले आहेत. जणू नातचं आहे त्या आभालाशी त्या माझ्या डोल्यांचं.

प्रस्थापित व्यवस्थे विरुद्ध बंड पुकारून मुक्त झालेय मी. मुक्तीचा आनंद आहे की नको असलेल्या मुक्तिचं दुखः... खुप अस्वस्थ झालेय. खुप खुपच चुकल्या चुकल्या सारखं वाटतय. बरोबर केलं की चुकले मी ..काही काही कळत नाहीय्ये.

जीवापाड जपलेली नाती ... वर्षानुवर्ष जोपसलेली नाती ...खरचं का इतकी कचकड्याची असतात ही नाती? शब्दाच्या बाणान्नी इतक्या सहज का विद्ध होऊ शकतात ही नाती?

निर्णय ..निर्णय घेताना... का तुटतात ही नाती?

नाती जपावी की मन. नुसता गोंधळ उडून जातो. एक मन म्हणते ... बरोबर केलास तू ... ता लगेच दुसरं म्हणते .... इतकिशी पण तडजोड नाही करू शकत तू ... अगदी तुझ्या जन्मदात्या साठी?
"तू ऐकणार नाहीस तर मग?"..
"पण... पण... तुम्ही समजुन का नाही घेत ?"
"काय समजुन घ्यायचयं ? आणी का समजुन घ्यायचयं? आम्हाला पण काही कळत असेलचं ना? बाप आहोत आम्ही तुमचे. आता तुमच्या कडून समजावून घ्यावं लागेल नाही का?"
आमच्या शब्दाला काही किंमत आहे की नाही?

धगधगत्या ज्वालामुखीचा जणू उद्रेक होत होता.

पण पिताजी माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे...
तरतर ..आम्ही जणू तुझ्या आयुष्याचा होम च मांडलाय न...आम्हाला कुठं काही कळत तुझं भलं बुर ... आम्ही तुला सुलावरच तर द्यायला निघालेलो आहे ..नाही का?
पिताजी ... मी डोळ्यात पाणी आणून बोलले ...
कायं गं काय वाईट करतोय आम्ही तुझं ? सात पिढ्या बसून खातील एवढी प्रसन्न आहे लक्ष्मी. आणी तू बसली आहेस शिक्षण शिक्षण करत...
काय चाटायचं त्या शिक्षणाला? ..शिक्षण घेउन ही कमावणार आहात तो पैसाच ना.

पिताजी ... प्लीज.... प्लीज माझ्या मनाचा ... थोड़ा.... थोड़ा तर विचार करा ना पिताजी... मी
कळवळुन बोलत होते.
खुप जपलं तुझं मन ... बस झालं आता ... तुला शिकू दिलं ही चुकच झाली म्हणा...

हेच शिकवतं नाही तुमचं शिक्षण ... मोठयांची अवज्ञा कशी करावी ते....
आम्ही अशिक्षित बरे तुमच्या पेक्षा ...नसतील वाचली चार बूकं, तुमच्या सारखी ... पण हे मात्र कसं कोळुन प्यायलो आहे ...
"रघुकुल रीती सदा चली आयी , प्राण जाई पर बचन ना जाई ..."
वचन... वचन... वचन... तुमच्या वचनासाठी तुम्ही लावताय माझं आयुष्य पणाला... आणी दुहाई देताय कुलाची ... वाह वाह...
तू ऐकणार नाहीस तर ...
नाही नाही नाही ....

अगदी तलाक ..तलाक ..तलाक च्या धर्तीवर मी काप-या पण ठाम शब्दात व्यक्तले. जणू निकाह व्ह्यायच्या आधीच तलाक झाला होता तो. नंतर प्रलया नंतर ची भयाण शांतता पसरली जणू . माझ्या त्या तार सप्तकानंतर ..त्यांचा खर्ज लागला ....
" ठीक आहे तर मग... आजपासून तू आम्हाला आणी आम्ही तुला मेलो...."

काळीज चिरत जाणारे ते शब्द... त्या शब्दांनी वर्षानुवर्ष जपलेली ..जोजवलेली नाती ..क्षणात अस्तंगत झालीत..
आठवणीचे मेघ बरसू लागलेत. भरून आलेलें डोळे वाहू लागलेत.

पार मागासलेल्या भागात पण उच्चवर्णीय कुलात जन्माला आलेले मी.... त्यांची कन्या. आईच्या पोटात असतांनाच म्हणे त्यांनी वचन दिलं होतं. मुलगी झाली की तुमची सुन म्हणुनच ह्या घरात वाढेल. बैठकितच इसार म्हणून तीन हजाराची बिदागी पण दिल्या गेली.

पिताजिंची परिस्थिति डबघाईचीच होती. मरता क्या नहीं करता , ह्या न्यायाने....बुडत्याला काठीचा आधार मिळाला.
आईचे दिवस भरत आलेले होते. सकाळी सरकारी दवाखान्यात भर्ती व्हायचे बेत सुरु होते. पण अचानक कळा सुरु झाल्यात आणी कसला दवाखाना आणी कसलं काय ... दवाखाना राहिला दूर आणी मी जन्माला आले.....

मुलगी झाली हो .... आनंदाला उधाण आलं होतं नुसतं लक्ष्मी च्या पावलांनी प्रवेशाले होते जणू मी. खरच चमत्कार होता की काय देव जाणे पण दिवस पालटायला लागले होते म्हणतात . हाता तोंडाशी असलेली गाठ आता सुटायला लागली होती हळु हळु, आणी चार पैसे शिलकीत पण पडू लागले. पिताजिंच्या व्यवसायात अचानक बरकत येऊ लागली. लेकीचा पायगुण चांगला म्हणून लेक लाडाची ना ठरती तर नवलच.
भैया आठ वर्षाचा होता तेव्हा. एवढा मोठा झाला पण शाळेची पायरी नव्हता चढला अजुन . चढणार तरी कसा म्हणा... इथे रोजच्या जेवणाची भ्रांत ... शाळेचे चोचले! कसे परवडणार ना ? शिलकित चार पैसे पडताच पिताजिंचं लक्ष गेलं ते भैया कड़े. आणी मग त्या मानान थोराड असलेला भैया शाळेत जाऊ लागला.

मुळात कुशाग्र बुद्धीचा भैया... संधी मिळताच ना चमकता तरच नवल . त्याची यशोराधाना सुरु झाली आणी मग त्यान कधी मागे वळुन पाहिलच नाही.

आज आय आय टी मधून स्नातक होउन अमेरिकेत स्थायिक झाले भैया... पिताजिंनी पसंद केलेल्या , त्याच्याही बाल पणीच ठरवलेल्या , मुलीबरोबर लग्न करून तो आनंदात (!!) जगतोय. भाभी त्याला तशी कुठेच शोभत नाही. ना शिक्षणात, ना दिसण्यात , ना वागण्यात ना बोलण्यात... पण तरी निभावतोय तिच्या सोबत ...फ़क्त पिताजिंच्या शब्दाखातर..

लहानशीच होते मी. भैया शाळेत जायचा. त्याचा तो ड्रेस , बूट, टाय ... छान वाटायचं. पण मला आवडायचं ते त्याचं दप्तर , त्यातली ती छान छान चित्रांची पुस्तकं. मी घरातचं असायची. त्याच्या त्या पुस्तकाशी मैत्री करावी असं मला वाटायचं. पण भैया मला देत नसायचा ती पुस्तकं. मी रडून रडून मग गोंधळ घालायचे.
आताशा माझा गोंधळ वाढतच होता. एक दिवस आई पिताजिंच्या मागे लागली. अहो हिला सुद्धा पाठवायचे का शाळेत?
कशाला? ... पिताजिंनी त्रासिक मुद्रा करीत विचारलं ... आपल्यात ती रीत नाही . तिला तुम्ही घरीच शिकवा घरकाम ... तरबेज करा त्यात , तेच कामात येइल सासरी जाईल तेव्हा.
घरात तणाव वाढायला लागला होता. माझ्या रोजच्या गोंधळाने आई पार वैतागुन जायची. आईचा मग पिताजिंच्या मागे लकडा लावण, रुसवे, फुगवे ..आता रोजचचं झालं. मग काय वाटलं त्यांना कुणास ठाउक... माझी पण शाळा सुरु झाली.
कुशाग्र बुद्धि जणू खानदानाचा वारसाच आमच्या. मीच थोड़े त्याला अपवाद असणार!

अभ्यासात मी भैया सारखेच चमकत होते. काकणभर सरसच. चौथित स्कोलरशिप, सातवीत स्कोलरशिप आणी एस एस सी ला तर बोर्डात चक्क जिल्ह्यातून पहिली आले होते मी. त्यावेळी वृत्तपत्रातून फोटो छापून आलेत , मुलाखती छापल्या गेल्यात... मी एकदम आकाशातच होते.

अभिनंदन सुनबाई ... एक गलेलट्ठ गोलमटोल व्यक्ति चावडी वरुन आत येत येत बोलली. ते ऐकून पिताजी धावतच पुढे आलेत, आईने डोक्यावरून पदर घेतला, आणी जवळ पास
ढकलतच मला आत पाठवले.
तेवढ्या वेळात में त्या ध्यानाला बघून घेतले. प्रचंड गोलाकार ते व्यक्तिमत्व, चहू बाजूनी ओसंडून वाहणारी ती काया, वेष साधा खेडवळच, पण वस्त्र प्रावरण अत्यंत उंची, हातात सोन्याचं कडं, पाची बोटात अंगठ्या, गल्यात रुळणा-या माळा. आणी त्या प्रचंड देहाची उंची मात्र जेमतेम ५ फुट. असं ते ध्यान पाहून मला हसुच आवरेना. त्या बुटक्या आणी स्थूल देहावर श्रीमंती कशी ओसंडून वहात होती.

आई ..कोण गं हे? कसबसं माझं हसू आवरत मी कुजबुजले.
अगं ते सेठ धन्नामल, तुझे होणारे सासरे...
माझे सासरे? में एकदम स्तंभित झाले ? कधी गं ठरलं माझं लग्न? आणी कोणी ठरवलं? मी तर कधीच पाहिलेलं नाही ह्यांच्या मुलाला... त्यानी कधी बघितलं आणी मला? काय करतात ह्याचे चिरंजीव? आणी कुठे असतात ते?
माझ्या प्रश्नांच्या सरबत्तीने ती माऊली एकदम हडबडली... आणी मग क्षणात स्वताला सावरत बोलली ... किती किती हे प्रश्न? आणी मग एक उसासा ताकत बोलली ... चल आटप लवकर लवकर... आता जरा कामाला लाग ... सांगेन मी नंतर...

मी अजुनही त्या धक्यातुन सावरले नव्हते

सेठजी निघून गेलेत. मला खुपशी अस्वस्थ करुनच.

बाबा मात्र एकदम खुष दिसत होते. त्यांच्या आनंदाला जणू उधाण आलेलं ... लगबग लगबग सुरु होती नुसती त्यांची. त्यांनी सगल्यान्ना बोलावलं आणी उत्साहात सांगू लागलेत.. सेठजी खुप खुष आहेत आपल्या बिटियावर, ते म्हणताहेत आता लवकर चा मुहूर्त धरा.

मी अजुनही त्या धक्क्यातून सावरले नव्हते. मी निरागस पणे बाबांना विचारलं ...

पिताजी कधी आणी कुणी हो ठरवलं माझं हे लग्न?

अगं तू जन्माला यायची सुद्धा होतीस तेव्हाच बांधल्या गेल्या आहेत ह्या गाठी. पिताजी उत्साहान सांगत होते.

हं ... मी एक थंड निश्वास सोडला ...

पिताजिंच लक्ष पण नव्हतं माझ्याकड़े , ते उत्साहनं सांगत होते , नाव काढलं आपल्या लेकीन. नशीब फळफळलय बघा आपलं. येवढं कार्य झालं की मी मुक्त होणार .

पिताजी एक विचारू ....

त्यांच्या उत्साहाच्या चौखूर उधळलेल्या वारू ला लगाम घालत जणू मी बोलले ,
डोक्यावर आठ्या घालत ते हुंकारले.... हूं .....

त्यांना असं मधेच अडवलेलं बहुदा रुचलं नसावं .

पिताजी काय करतात सेठ्जींचे चिरंजीव ? काय वय आहे त्यांचं? आणी काय शिकलेले आहेत ते? कसे दिसतात ते? एखादा फोटो मिळेल का बघायला?

किती प्रश्न हे... आणी किती ही उलट तपासणी.

अगं इतकी प्रसन्न आहे लक्ष्मी त्यांच्या वर ..की बाकी सगळ त्या पुढे गौणच. साथ पिढ्या नुसतं बसून खाल्ल तरी शिग नाही उतरणार , खुप हौशी आहेत , शौकीन पण . शिक्षण शिक्षण काय घेउन बसली आहेस ... न शिकताही सुखी संसार करतोच आहे की आम्ही पण... मुलाचं वय वगैरे नसते हो बघायचं ... घोड़ा और मर्द कभी बूढ़े नहीं होते...

पिताजी उत्साहनं बरच काही सांगत होते आणी त्यांचे ते शब्द जणू माझ्या कानात तापलेलं शिसं ओतल्या सारखे घुसत होते . में सुन्न झाले ..बधिर झाले ... कसंबसं स्वतःला सावरत अगदी म्लान स्वरात पुटपुटले ...

मला वाटते पिताजी ..मला नाही जमणार हे लग्न...

काय???? पिताजी तार सप्तकात खेकसलेत ...सगळ्याचा थरकाप उडाला ....

जादा माज आलाय का? फार चूर चूर चालतेय जीभ ... कापून काढीन ... म्हणे जमणार नाही. बघतोच तर असं कसं नाही जमत ते ... हां काही बाहुला बाहुलिचा खेळ वाटतो की काय तुम्हाला ... आमच्या शब्दाला काही किंमत आहे की नाही?
शब्द ..शब्द ..शब्द ... मला विचारलं होतं का कधी देतांना असा शब्द ...

असा शब्द देऊन माझ्या जिंदगिचा असा लिलाव केलात तुम्ही ... काहीच नाही वाटलं तुम्हाला पिताजी ? मी अत्यंत निरागस पण ठामपणे विचारत होते

नालायक ... थोबाड वा करून बोलतेस बापाशी... काही लाज शरम...

आता माझाही संताप वाढू लागला होता ...
पिताजी ..माझं हे साधं बोलण जर नालायकपणा असेल तर ..हो मी आहेच नालायक ...

" ऐकणार नाहीस तर मग तू .... "
खुप इच्छा होतेय ..भैय्याशी बोलावं ... त्याला सांगावं ... पण तो काय करणार आहे ..काय करू शकणार आहे ... तो कसली साथ देऊ शकणार .. शब्द बंधनात त्याचं ही आयुष्य उधळुन गेलय त्याचं ..स्वतः ला नाही सावरू शकला ..मला काय साथ देणार ...

माझ्या कालिंदीच्या डोहालाच सांगते मी माझं हे गुज ... तो तरी करेल ना जवळ मला... मुक्त झाले आहे ना मी ..की परत बंधनात अडकत चालले आहे मी ... काही समाजात नाहीय्ये ...

सुनील जोशी
२२/०६/२०११